• Login
  • Submit News
समाजाची जनगणना Contact Us
 
Kumawat Beldar Kumawat Beldar
  • मुख्यपान
  • शहर
  • क्रीडा
  • राजकारण
  • करिअर
  • आरोग्य
  • विचार मंथन
  • उल्लेखनीय व्यक्ती
Details
Category: समाज सुधारक

कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील गाथा भाग ३

कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे.कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर 1887 रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.कर्मवीरांच्या गावी कुंभोज मध्ये 'सत्त्यापाचे बंड'हे प्रकरण खोप गाजले होते.कुंपणाच्या काट्या तोडणाऱ्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले.सत्त्याप्पा भोसलेला त्याचा सात्त्विक संताप आला.रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले.व तो फारारी झाला.तो कार्मावीर अण्णाच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला.छोट्या भाऊरावाना तो अंगाखांद्यावर खेळवी.तोकर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे.बंडखोरी,'अन्यायाविरुद्ध चीड हे सदगुण सत्त्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले.त्यंच्या बालपणी सार्वजनिक ठिकाणी पाणी भारता येत नसे.

इतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे.पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागे. एकदा ते दृष्यपाहून अण्णाचे हृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी राहाठ मोडून आडात टाकला.कार्मावीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले.विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रगीचे शिक्षण झाले.तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले.कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहूदलितांना महाराज होते.भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता.त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला.सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले.समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ 'युनियन बोर्डींग'ची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. १९३५ मध्ये 'महात्मा फुले अध्यापक विद्यालय' त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते

Details
Category: समाज सुधारक

कर्मवीर भाऊराव पाटील गाथा भाग 2

भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहुजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव (पद) भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत, ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत. [१]

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर (कृतींचा राजा) ही उपाधी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि १९८८ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला.

Details
Category: समाज सुधारक

कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर १८८७ - ९ मे) आज पासून निबंध सुरु

kumawatbeldar bhaurao patil     कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर १८८७ - ९ मे १९५९) हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.
भाऊराव पाटील
जन्म सप्टेंबर २२, इ.स. १८८७
कुंभोज, महाराष्ट्र
मृत्यू-मे ९, इ.स. १९५९
टोपणनावे-कर्मवीर,पेशा
समाजसुधारणा, शिक्षणप्रसार
प्रसिद्ध कामे-रयत शिक्षण संस्था
मूळ गाव-कुंभोज, महाराष्ट्र
पुरस्कार-पद्मभूषण (१९५९)

सामाजिक

  • हार्दिक अभिनंदन
  • शैक्षणिक
  • समाज सुधारक
  • शिष्यवृत्ती
  • उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व
  • समाजा विषयी
  • भावपूर्ण श्रद्धांजली
  • रोजगार

interviewमुलाखत

Screenshot 2023 09 24 13 22 00 91 e55d67e6190e80b161828c9e2aa77e01

इ. प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत (सरताळे)

prafullachandra kस्वर्गीय पोपटराव शंकरराव कुमावत (सरताळे) प्राथमिक शिक्षक नांदगाव व श्रीमती सुशिलाताई पोपटराव कुमावत  (सरताळे), सेवानिवृत्त शिक्षिका नांदगाव यांचा मी मोठा मुलगा प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत, उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्य करायचे ठरविले व त्याप्रमाणे सध्या उपाध्यक्ष भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा जयपुर या राष्ट्रीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे तसेच सुमारे वीस वर्षापासून नाशिक जिल्हा उन्नती मंडळाचा मार्गदर्शक कधी आहे.

15 ऑगस्ट पासून कुमावत बेलदार हे पोर्टलची सुरुवात करीत आहे. नवीन माध्यमातून नवीन शतकाचा विचार करून हे काम सुरू करणार आहे.

आपले आशीर्वाद पाहिजे म्हणजे यश मिळेल.

धन्यवाद

देविदास मुरलीधर परदेशी (पन्हेर)

devidas pरयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मधून दहावी पर्यंत गरीब विद्यार्थी फंडातून शिक्षण घेतले. स्वत: वडिलांचा पारंपारिक व्यवसाय सुरु केला. अजय विजय construction चे ते आज contractor आहेत. स्वतःचा सलग चार वर्ष महा कुमावत वार्ता हा डिजिटल पेपर चालवला. कुमावत समाजाचे जिल्हा सहसचिव ते आज विकास सेवा संस्थेच्या प्रदेश सचिव पदावर सामाजिक कार्य करता. भटक्या -विमुक्त ,  बारा बलुतेदार, बेलदार समाज उप  जातीचे ही सामाजिक कार्य करतो.

कुमावत समाजा करिता कुमावत बेलदार  वेब  पोर्टल मा. प्रफुल्लचंद्र कुमावत  साहेबांबरोबर कार्य सुरू करत आहे.  या वेब पोर्मटल मध्ये समाज फक्त समोर ठेवून गट-तट वगैरे नाही असे कार्य करायचे आहे आपल्या सर्वांचे सहकार्य पाहिजे.

 

Copyright © 2023 www.KumawatBeldar.com. All Rights Reserved.
Website developed by 'The LightHouse IT Solutions'