- Details
- Category: विचार मंथन
मत प्रतिक्रिया
द्वारा :शिवाजी तुकाराम कुमावत
ता. चाळीसगाव
दिनांक 24 जानेवारी 2024
प्रति
म.संपादक साहेब
कुमावत बेलदार न्यूज पोर्टल ,नाशिक.
आपण कुमावत बेलदार न्यूज पोर्टलची स्थापना केली ही कुमावत बेलदार समाजासाठी भूषणावह आहे तसेच हा उपक्रम अभिनंदनीय व स्तुत्य आहे.
आपण कुमावत बेलदार समाजासाठी महाराष्ट्रभर उपयुक्त माहितीस्तव 2024 चे आदर्श दिनदर्शिका प्रसिद्ध केली ती संपूर्ण बाराही महिन्याची वाचली तर प्रत्येक महिन्यात दुग्धशर्करा योगच वाचावयास मिळत गेला .त्यात अत्यंत कठोर तपश्चर्याने ,परिश्रमाने ,अनुभवाने अशा थोर व्यक्तींचे हितगुजांचे लिखाण केलेले आहे. या थोरांचे मार्गदर्शन समाजास लाभले आहे व लाभेलही! ते रोज प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे व त्यानुरूप रोजची दैनंदिनी आखली पाहिजे म्हणजे निश्चितच जीवनात अमुलाग्र बदल होऊ शकतो असे माझे प्रामाणिक मत आहे .
दिनदर्शिका 2024 मधील श्रेष्ठ व्यक्तिमत्व असणाऱ्यांनी समाजातील अडीअडचणी आम्ही सोडवू ,प्रयत्न करू ,वेळ देऊ असा उदात्त हेतू सुद्धा प्रकट केला आहे
संपादक मंडळांनी आपला बहुमोल वेळ खर्च केला त्यांचा मी ऋणी आहे.
धन्यवाद
- Details
- Category: विचार मंथन
परिस्थिती गंभीर, बाप खंबीर; लेकीचा सासरी छळ, वडिलांनी वाजतगाजत माहेरी आणलं; वरातीची चर्चा
परिस्थिती गंभीर, बाप खंबीर; लेकीचा सासरी छळ, वडिलांनी वाजतगाजत माहेरी आणलं; वरातीची चर्चा
सासरच्यांकडून लेकीचा छळ होत असल्यानं वडिलांनी तिला वाजतगाजत माहेरी आणलं. लेकीची त्रासातून सुटका झाल्याचा आनंद त्यांनी बँडबाजा वाजवून साजरा केला. या वरातीची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.
Authored By कुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Oct 2023, 2:27 pm
Follow
रांची: रांचीमध्ये निघालेल्या एका वरातीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सासरी निघालेल्या लेकीसाठी नव्हे, तर सासरी छळ होत असलेल्या लेकीला माहेरी आणण्यासाठी एका बापानं वरात काढली. सासरच्यांच्या जाचापासून लेकीची सुटका करण्यासाठी बापानं तिला वाजतगाजत घरी आणलं. वरातीमध्ये बँडबाजा होता. आतषबाजी करण्यात आली.
father daughter
१५ ऑक्टोबरला काढण्यात आलेल्या वरातीचा व्हिडीओ वडिलांनी सोमवारी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला. 'मोठी स्वप्नं डोळ्यांत घेऊन आपण लेकींची लग्नं लावतो. पण जेव्हा त्यांचा जोडीदार, कुटुंब वाईट निघतात, त्यांना चांगली वागणूक देत नाहीत, तेव्हा आपल्या मुलींचा सन्मान राखण्यासाठी त्यांना पुन्हा घरी आणायला हवं. कारण लेकी अनमोल असतात,' असं प्रेम गुप्ता यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ट्रक पेटल्यानं मृत पावलेला माजी नौदल कर्मचारी २० वर्षांनंतर जिवंत; ३ खुनांचं गूढ उकललं
झारखंडच्या रांचीमधील कैलाश नगरमधील कुम्हारटोली परिसरात राहणाऱ्या प्रेम गुप्ता यांनी त्यांची लेक साक्षीचा विवाह वर्षभरापूर्वी धुमधडाक्यात लावून दिला. झारखंड वीज वितरण विभागात सहायक अभियंता असलेल्या सचिन कुमारसोबत २८ एप्रिल २०२२ रोजी साक्षीचं लग्न झालं. सचिन रांचीच्या सर्वेश्वरी परिसरात राहतो. लग्नानंतर काही दिवसांनीच सासरच्यांनी साक्षीला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप प्रेम गुप्ता यांनी केला.
सचिन अनेकदा साक्षीला घराबाहेर काढायचा. सचिनची आधी दोन लग्नं झाली असल्याचं साक्षीला समजलं. त्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतरही साक्षीनं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला. पण शोषण आणि जाचामुळे तिला सासरी राहणं अवघड जाऊ लागलं. त्यामुळे तिनं या नात्यातून बाहेर पडण्याचा, सासर सोडण्याचा निर्णय घेतला.
मजुराच्या खात्यात आले तब्बल २२१ कोटी, ITनं नोटिस पाठवली; मग ४ वर्षांपूर्वीची घटना आठवली
साक्षीच्या निर्णयाला तिच्या कुटुंबियांनादेखील खंबीरपणे साथ दिली. वडील आणि माहेरच्या मंडळींनी वरात काढत तिला वाजतगाजत घरी परत आणलं. लेकीची जाचातून मुक्तता झाली. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी वरात काढल्याचं प्रेम गुप्ता यांनी सांगितलं. साक्षीनं घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मुलानं तिला पोटगी देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे लवकरच घटस्फोटावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
- Details
- Category: विचार मंथन
2018 मध्ये सादर करण्यात आलेले "वन नेशन, वन रेशन कार्ड" ही भारतातील अंतर्गत स्थलांतरितांसह सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आधार-आधारित राष्ट्रीय रेशन कार्ड पोर्टेबिलिटी योजना आहे
. यात लाभार्थीच्या ऑनलाइन पडताळणीसाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्डाचा वापर करण्यात आला. हे स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देशात कोठेही कोणत्याही रास्त भाव दुकानातून PDS लाभ मिळवण्यास सक्षम करते, अशा प्रकारे रेशन कार्डच्या आंतर-राज्य पोर्टेबिलिटीद्वारे अन्न सुरक्षा सुनिश्चित करते. मार्च 2021 पर्यंत, 20 राज्ये आधीच या योजनेत सामील झाली आहेत आणि उर्वरित या योजनेत स्थलांतरित होण्याच्या प्रक्रियेत आहेत. [४]
यापूर्वी "अन्नवितरण पोर्टल" ने राज्यातील ई-पीओएस उपकरणांद्वारे अन्नधान्याच्या वितरणाचा डेटा ठेवला होता, ज्यामुळे स्थलांतरित कामगार किंवा त्याच्या कुटुंबाला त्यांच्या जिल्ह्याबाहेर
- Details
- Category: विचार मंथन
मी तीस दिवस काम केले, पगार घेतला - कर भरला.कर भरला.कर भरला.
मी तीस दिवस काम केले,
पगार घेतला - कर भरला.
मोबाईल विकत घेतला - कर भरला.
रिचार्ज - कर भरला.
डेटा घेतला - कर भरला.
वीज घेतली - कर भरला.
घर घेतले - कर भरला.
टीव्ही फ्रीझ घेतले- कर भरला.
गाडी घेतली -कर भरला.
पेट्रोल घेतले - कर भरला.
सेवा पूर्ण झाली -कर भरला.
गाड़ी रस्त्यावर चालवली - कर भरला.
पुन्हा टोलवर कर भरला.
निर्मित परवाना -कर भरला.
चालक परवाना घेतला-कर भरला.
तुम्ही चूक केली असेल तर - कर भरला.
रेस्टॉरंटमध्ये खाल्ले - कर भरला.
पार्किंगसाठी कर भरला.
पाणी घेतले -कर भरला.
रेशन खरेदी केले -कर भरला.
कपडे विकत घेतले - कर भरला.
शूज विकत घेतले - कर भरला.
तुम्ही असंख्य वस्तु घेतल्या - कर भरला.
शौचालयात गेलो - कर भरला.
औषधी विकत घेतली- कर भरला.
गॅस घेतला - कर भरला.
आणखी शेकडो गोष्टी घेतल्या आणि -कर भरला. काही ठिकाणी फी भरली, काही ठिकाणी बिले भरली गेली,काही ठिकाणी व्याज भरले गेले,कुठे दंडाच्या नावाने,कुठे लाचेच्या नावाने पैसे द्यावे लागले,एवढ्या नाटकानंतर,चुकून जर मी सेव्हिंगमध्ये बचत केली त्यावर कर भरला.
आजीवन काम केल्यानंतर सामाजिक सुरक्षा नाही. पेन्शन नाही.
वैद्यकीय सुविधा नाही. मुलांसाठी चांगल्या शाळा नाहीत.
सार्वजनिक वाहतूक नाही.
रस्ते खराब आहेत,पथदिवे खराब आहेत,हवा खराब आहे,पाणी खराब आहे,फळे आणि भाज्या विषारी आहेत.
रुग्णालये महाग,दरवर्षी महागाईचा फटका, अनपेक्षित खर्च आणि संकटे,मग सगळीकडे रांगा.
सगळा पैसा गेला कुठे???? भ्रष्टाचारात,
निवडणुकीत,
श्रीमंतांना अनुदानात,
मल्ल्यासारखा फरार
श्रीमंतांच्या बनावट दिवाळखोरीत,
स्विस बँकांमध्ये,
नेत्यांच्या बंगल्यात आणि गाड्यांना...
आता कोण सांगू चोर कोण???
अखेर आपले देशवासी असेच किती दिवस ओढाताणीत जीवन जगत राहणार?
- Details
- Category: विचार मंथन
मृत्यू नंतर देहदान करत अण्णांची इच्छा पूर्ण (3)
कै. श्री. दत्तात्रेय( अण्णा) गोविंदराव नाईक( बारवाळ )
वय वर्ष 90 शुक्रवार दिनांक 18/ 8 /2023 रोजी सकाळी 9:00 वाजता कसलेही आजारपण नसताना वृद्धापकाळाने आकस्मित दुःखद निधन झाले .त्यांच्या इच्छेप्रमाणे